Mumbai, मे 2 -- wear gems according to your zodiac sign : सनातन धर्मात ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कुंडलीतील ग्रह-नक्षत्र, दशा, महादशा, योग, करण इत्यादींची स्थिती पाहून ज्योतिष शास्त्र व्यक्तीचे भविष्य ठरवते. कुंडलीत काही दोष असल्यास किंवा कोणताही ग्रह कमजोर झाल्यास व्यक्तीला जीवनात कठीण प्रसंगातून जावे लागू शकते.

ज्योतिषांच्या मते शनि, राहू आणि केतूची महादशा त्रासदायक आणि कष्टाची असते. याशिवाय जेव्हा शुभ ग्रह अस्त होतात तेव्हा व्यक्तीला जीवनात दुःखाचा सामना करावा लागतो.

त्याचबरोबर कुंडलीत राशीचा स्वामी आणि शुभ ग्रह बलवान असल्यास व्यक्तीला सर्व प्रकारचे सांसारिक सुख प्राप्त होते. यासाठी ज्योतिषी रत्न घालण्याचा सल्ला देतात. तुम्हालाही तुमची आर्थिक स्थिती सुधरवायची असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार ही रत्ने परिधान करू शकता....